Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Showing posts with label छत्रपती शिवाजी महाराज. Show all posts
Showing posts with label छत्रपती शिवाजी महाराज. Show all posts

Saturday, 7 February 2015

अंकशास्त्राचे आश्चर्यकारक उदाहरण

-महावीर सांगलीकर
914531228

अंकशास्त्रामध्ये 22 हा नंबर ‘मास्टर बिल्डर’ म्हणून ओळखला जातो. ज्यांचा जन्मांक किंवा भाग्यांक 22 आहे त्यांच्याकडे कांहीतरी अविश्वसनीय, भव्य-दिव्य करून दाखवण्याची ताकत असते. पण बहुतेक वेळा हा नंबर मिळालेले लोक त्या शक्तिचा उपयोग करून घेत नाहीत. जे लोक असा उपयोग करून घेतात, त्यांच्याकडून आश्चर्यकारक काम घडते.

इथे मी कांही उदाहरणे देत आहे. मेवाडचे महाराजा उदयसिंग (दुसरे), त्यांचा मुलगा महाराणा प्रताप सिंह आणि छत्रपती शिवाजी महाराज  यांच्याविषयी, त्यांच्या लढाऊ जीवनाविषयी  बहुतेकांना माहीत असतेच. त्यांच्या जन्मतारखा आणि संपूर्ण जन्मतारखेची बेरीज पहा:

महाराजा उदयसिंग (दुसरे)
जन्मतारीख:  4.8.1522
पूर्ण बेरीज: 4+8+1+5+2+2=22

महाराणा प्रताप:
जन्मतारीख: 9.3.1540
पूर्ण बेरीज : 9+3+1+5+4+0=22

छत्रपती शिवाजी महाराज
जन्मतारीख: 19.2.1630
पूर्ण बेरीज: 1+9+2+1+6+3+0=22



कांही लोक याला केवळ योगायोग मानतील. पण अंकशास्त्रात अशी अनेक उदाहरणे आहेत की ज्याच्यामुळे या गोष्टी केवळ योगायोग नसून नंबर्सचा आपल्या जीवनावर प्रभाव पडतो हे दाखवून देतात.

वर दिलेल्या उदाहरणातील तीनही व्यक्तिंचा भाग्यांक 22 हा आहे. त्याचप्रमाणे ज्यांचा जन्मांक 22 आहे, अशा अनेक लोकांनी असेच कांही भव्यदिव्य करून दाखवले आहे. अमेरिकेचे पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन हे त्याचे एक उदाहरण. अमेरिकेच्या सशस्त्र स्वातंत्र्य लढ्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांची जन्म तारीख 22 होती.

22 जन्मतारीख असणारे लोक  कांहीतरी भव्य-दिव्य करून दाखवतात याची आणखी कांही उदाहरणे म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील आणि राजाराम मोहन रॉय.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील घटना आणि त्यांच्याशी अंकांचा असलेला संबंध याविषयीचा माझा लेख येथे वाचा: छत्रपती शिवाजी महाराज अंकशास्त्राच्या नजरेतून

हेही वाचा:
 शक्तिशाली मास्टर नंबर्स 
जन्मांक 4: जन्मतारीख 4, 13, 22, 31

छत्रपती शिवाजी महाराज अंकशास्त्राच्या नजरेतून

 © महावीर सांगलीकर

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी येथे झाला. अंकशास्त्राच्या दृष्टीने ही तारीख 'युनिक' प्रकारची आहे.

19 हा अंक अंकशास्त्रात 1+9=10=1+0=1 असा होतो. याला जन्मांक (Birth Number) असे म्हणतात. जे लोक कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेस जन्मले त्या सगळ्यांचा जन्मांक 1 येतो. अंकशास्त्रानुसार 1 हा अंक सर्वात चांगला व महत्वाचा अंक मानला गेला आहे. ज्यांचा जन्मांक 1 असतो त्या व्यक्ति स्वयंभू, दूरदृष्टीचे, महत्वाकांक्षी, प्रचंड नेतृत्वगुण असणारे, हाती घेतलेले कोणतेही काम तडीस नेणारे, दुय्यम स्थान न स्वीकारणारे, भावनांपेक्षा कर्तव्याला महत्व देणारे, शिस्तप्रिय असे असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्यात हे सगळेच गुण एकवटलेले दिसतात.

अंकशास्त्रात जन्मांकाप्रमाणेच  भाग्यांकाला (Life Path Number)  देखील महत्व आहे. भाग्यांक म्हणजे पूर्ण जन्म तारखेतील सर्व अंकांची बेरीज. महाराजाची जन्मतारीख 19.2.1630 आहे. यातील अंकांची बेरीज 1+9+2+1+6+3+0=22 अशी येते. 22 हा नंबर मास्टर नंबर मानला गेला आहे आणि तो फारच थोड्या लोकांच्या वाट्याला येतो. शिवाय जन्मांक 1 आणि भाग्यांक 22 ही तर फारच दुर्मिळ गोष्ट.

जन्मांक आणि भाग्यांक हे दोन्ही त्या-त्या व्यक्तीच्या जीवनात घडणा-या घटनांवर प्रभाव टाकतात. तसेच पूर्ण जन्मतारखेत एखादा अंकगट दिसत असेल तर त्यातील अंकही घटनांवर प्रभाव टाकतात. 19.2.1630 या जन्मतारखेत 3,6,9 हे एका गटातील तीनही अंक आलेले दिसतात. तसेच 1630 यातील सर्व आकड्यांची बेरीज 1 होते. (बहुतेकांच्या बाबतीत त्यांच्या जीवनात कांही ठराविक तारखा रिपीट होत असलेल्या दिसतात).

आता आपण शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्वाच्या घटना पाहिल्या तर त्या ज्या तारखेची बेरीज 1, 3, 6 किंवा 9 येते अशा तारखेस घडलेल्या दिसतात. पुढील घटना पहा:

(ज्या सालांच्या खाली रेघ आहे, त्या सालातील अंकांची बेरीजही 1, 3, 6 किंवा 9 येते. ती त्या-त्या सालापुढे कंसात दिली आहे. ज्या महिन्यांच्या खाली रेघ आहे, ते महिने जानेवारी, मार्च, जून, सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा डिसेंबर असे आहेत. म्हणजे  पहिला, तिसरा, सहावा, नववा, दहावा किंवा बारावा महिना ).

जन्म: 19 फेब्रुवारी 1630  (1)

जावळी ताब्यात घेतली: 15 जानेवारी 1656   (9)

रायगड किल्ला जिंकला: 6 एप्रिल 1656 (9)

अफजलखानाची भेट व त्याचा वध: 10 नोव्हेंबर 1659 (3)

प्रतापगडचे युद्ध:  10 नोव्हेंबर 1659 (3)
कोल्हापूरचे युद्ध: 28 डिसेंबर 1659 (3)
मोगल सरदार करतलब खान याचा पराभव केला: 3  फेब्रुवारी 1661
सुरतेवर स्वारी: 6 जानेवारी 1664
सिंधुदुर्ग हा समुद्री किल्ला बांधला: 24 नोव्हेंबर1664
औरंगजेबाच्या दरबारात: 12 मे 1666 (1)
आग्र्याहून सुटका: 19 ऑगस्ट 1666 (1)
राजाराम महाराजांचा जन्म: 24 फेब्रुवारी 1670 
तानाजीने कोंढाणा किल्ला जिंकला: 15 मार्च 1670
पुरंदर किल्ला पुन्हा घेतला: 24 मार्च 1670
सुरतेवर दुसरी स्वारी: 3 ऑक्टोबर 1670
राज्याभिषेक: 6 जून  1674  (9)
दुसरा राज्याभिषेक: 24 सप्टेंबर 1674 (9)
जिजाउंचा मृत्यू: 18 जून 1674 (9)
महाराजांचा मृत्यू: 3 एप्रिल 1680  (6)

विशेष म्हणजे महाराजांचे वडील शहाजीराजे यांची जन्म तारीख 18 मार्च तर आई जिजाउंची जन्म तारीख 12 जानेवारी ही होती.

याशिवाय महाराजांच्या आयुष्यातील कांही महत्वाच्या घटना ज्यांची बेरीज 1, 3, 6 किंवा 9 येते अशा तारखेस घडलेल्या दिसत नाहीत, पण त्या ज्या साली घडल्या, त्या सालातील अंकांची बेरीज 1, 3, 6 किंवा 9 येते. त्या घटना अशा:

पुरंदर किल्ला घेतला: 1648=1+6+6+8=21=2+1=3
संभाजी महाराजांचा जन्म: 1657=1+6+5+7=19=1+9=10=1+0=1
सईबाई यांचा मृत्यू : 1659=1+6+5+9=21=2+1=3  
पुरन्दरचा तह: 1665 = 1+6+6+5 = 18 =1+8 = 9
नेसरीची लढाई: 1674=1+6+7+4=18=1+8 =9
एकोजी राजांचा पराभव: 1677 =1+6+7+7=21=2+1=3

Money Visualization

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख